UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

बार्शीत मुस्लिम बिरादार जमात संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.

SHARE:

 

१०८ गुणवंत विद्यार्थी, डॉक्टर, वकील व स्पर्धा परीक्षांतील यशस्वींचा गौरव; शिक्षण, व्यसनमुक्ती व समाजाच्या प्रगतीवर मान्यवरांचा भर

स्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी) – दिनांक : ६ जुलै २०२६

▶️ यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्साहात पार पडला कार्यक्रम

बार्शी येथील मुस्लिम बिरादार जमात संस्थेच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा रविवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्साहात पार पडला. वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दिलीप सोपल होते, तर उद्घाटक म्हणून आमदार राजेंद्र राऊत उपस्थित होते.

▶️ मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास तहसीलदार एफ. आर. शेख, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, नाशिरभाई मुलाणी, डॉ. संदीप तांबारे, प्राचार्य डॉ. अब्दुल शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष हाजी ज. इकबालभाई पटेल यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर संघटक वाहिदपाशा शेख यांनी प्रास्ताविक केले.

 

▶️ १०८ गुणवंत विद्यार्थ्यांचा सहभाग सन्मान

यावेळी समाजातील १०८ गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या अधिकारी, डॉक्टर आणि वकील यांचाही विशेष गौरव करण्यात आला.

▶️ शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्या – आमदार दिलीप सोपल

मार्गदर्शन करताना आमदार दिलीप सोपल यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणावर भर द्यावा व समाजातील प्रत्येक मुलगा-मुलगी मुख्य प्रवाहात यावी यासाठी पालकांनीही जागरूक राहण्याची गरज असल्याचे सांगितले. शिक्षण हाच समाजाच्या प्रगतीचा खरा पाया असल्याचे त्यांनी नमूद केले.

▶️ स्पर्धेच्या युगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही – तहसीलदार एफ. आर. शेख

तहसीलदार एफ. आर. शेख यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या जगात प्रचंड स्पर्धा असून या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यास करून आपले ध्येय निश्चित करावे आणि त्यासाठी मेहनत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

▶️ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर

डॉ. संदीप तांबारे यांनी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनप्रवासाचा उल्लेख करत, अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन त्यांनी देशाचे राष्ट्रपतीपद गाठले आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळख निर्माण केली, असे सांगितले. कठोर परिश्रम आणि शिक्षणाच्या बळावर कोणतीही उंची गाठता येते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

▶️ मुस्लिम समाजाच्या विकासासाठी सहकार्य -आ राजेंद्र राऊत 

आमदार राजेंद्र राऊत यांनी मुस्लिम समाज मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींमध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी आपण कायम सकारात्मक भूमिका घेऊ, असे त्यांनी सांगितले.

▶️ मोबाईल व व्यसनांपासून मुलांना दूर ठेवा – समीर काझी

वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणावर अधिक भर द्यावा, असे सांगताना मुलींची शैक्षणिक प्रगती मुलांच्या तुलनेत अधिक असल्याचे नमूद केले. अनेक मुले मोबाईल, रील्स आणि विविध व्यसनांच्या आहारी जात असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी पालकांनी मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, असे आवाहन केले. गुटखा, तंबाखू आणि इतर व्यसनांपासून मुलांना दूर ठेवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

▶️ बार्शीच्या राजकारणात चर्चेचा विषय; आमदार दिलीप सोपल आणि आमदार राजेंद्र राऊत एकाच व्यासपीठावर

मुस्लिम बिरादार जमात संस्थेच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे बार्शी तालुक्याचे आमदार दिलीप सोपल आणि सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत हे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणे होय. दोन्ही लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. दोन्ही नेत्यांची एकत्र उपस्थिती कार्यक्रमात उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरली.

▶️ समाजासाठी हॉल, हॉस्पिटल व शैक्षणिक संस्थेची मागणी

संस्थेचे अध्यक्ष हाजी ज. इकबालभाई पटेल यांनी समाजासाठी स्वतंत्र हॉल, हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी सहकार्याची मागणी केली. यावर आमदार दिलीप सोपल, आमदार राजेंद्र राऊत आणि वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

▶️ महिलांची मोठी उपस्थिती; सभागृह खचाखच भरले

कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती. यशवंतराव चव्हाण सभागृहाचा खालचा व वरचा मजला पूर्णपणे भरून गेला होता. समाजबांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त झाले.आभार अख्तर शेख यांनी मानले

▶️ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान

हाजी ज. इकबालभाई पटेल, सचिव जाकीरहुसेन युसूफ शेख, खजिनदार वसिमभाई रमजान पठाण, सहसचिव अख्तर ईन्नुस शेख, संघटक वाहिदपाशा शेख, कायदेशीर सल्लागार ॲड. सर्फराज मुजावर व ॲड. रियाज शेख, उपाध्यक्ष सलीम ख्वानाभाई शेख, रफिकभाई सातारकर, सादिकभाई मुल्ला, इब्राहीमभाई काझी यांच्यासह उस्मानअली शाह साहेब, आबेदभाई सय्यद, इस्माईलभाई पटेल, इरफानभाई शेख, शाहनवाजभाई मुल्ला, समशेरभाई (रॉनी) सय्यद, अयाज आयुब शेख, जमीरभाई शेख (पत्रकार), एजाजभाई शेख, सादिकभाई काझी, शकीलभाई मुलाणी, फेरोजभाई पठाण, रियाजभाई पठाण (पत्रकार), मुसाभाई मुलाणी, साजनभाई शेख, इम्रानभाई झारेकरी, जफरभाई शेख, अकिबभाई पठाण, शाकीरभाई शेख, अब्बासभाई शेख, शकीलभाई झारेकरी आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

 

 

0
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें