www.starmazanews.comपुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
आळंदी:- श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र देहू अशा स्वरूपात दि.९जानेवारी रोजी संत संगम भेट सायकल रॅलीचे आयोजन आळंदी पत्रकार संघ व स्वच्छता सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा अभियान ३.०अंतरग पालिकेतर्फे करण्यात आले होते.या प्रवासात नदी प्रदूषणाबाबत प्लास्टिक कचरा नदीमध्ये न टाकणे, नदीमध्ये जनावरे तसेच कपडे न धुणे , रासायनिक पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणी करून सोडने, सांडपाणी शुद्धीकरण करणे याबाबत जनजागृती करण्यात आली.श्री संत तुकाराम महाराज संस्थान , आळंदी नगरपरिषद, आळंदी, चिखली टाळगांव, देहू,मोई,चिंबळी,केळगाव,या ग्रामस्थांचे या सायकल रॅलीला सहकार्य लाभले.या सायकल रॅलीचा श्री क्षेत्र आळंदी येथुन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या हस्ते शुभारंभ झाला.
चिखलिमध्ये तेथील ग्रामस्थांनी या सायकलस्वारांचे स्वागत केले.श्री क्षेत्र देहू मध्ये संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.नितीन महाराज मोरे व देहू ग्रामस्थांनी या सायकल रॅलीचे स्वागत केले.देहू येथील इंद्रायणी घाटावर इंद्रायणी मातेची आरती करण्यात आली.त्यानंतर मोई, चिंबळी, केळगाव व आळंदी मध्ये आनंदराव मुंगसे यांच्या कुटुंबीयाकडुन सर्व सायकलस्वारांचे औक्षण करण्यात आले.आरिफ शेख यांनी गूलाब पुष्प देऊन स्वागत केले.यावेळी पालिका कार्यालयीन अधिकारी किशोर तरकासे, पुणे चिंचवड ग्रुप सायकलस्वार विलास काटे, विठ्ठल शिंदे, जोशी मॅडम, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, संदीप महाराज लोहार, राहुल नेवाळे,प्रसाद बोराडे,प्रकाश पानसरे, दिनेश कुर्हाडे,नाझीम शेख, ज्ञानेश्वर फंड,शिरीष कारेकर, निसार सय्यद,व ग्रामस्थ मान्यवर पलिकेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.