www.starmazanews.com प्रतिनिधी विजय शिंगाडे
*अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर भाजपा किसान मोर्चाचे साखर आयुक्त पुणे कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन* — पुर्व मराठवाडा सपंर्क प्रमुख रामदास कोळगे यांची माहिती
धाराशिव दि 5 (प्रतिनिधी )राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ऊस उत्पादक शेतक-यांना वा-यावर सोडले असुन ,अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाल्याने भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा, प्रदेश अध्यक्ष वासुदेवनाना काळे यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवार (दि ५ ) पासुन साखर आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले असल्याची माहिती भाजपा किसान मोर्चाचे रामदास कोळगे यांनी दिली आहे.
राज्य सरकार व साखर आयुक्त यांनी योग्य प्रकारे मराठवाड्यातील अतिरिक्त ऊसाचे नियोजन केले नसल्याने अद्याप शेतक-यांच्या शेतात ऊस उभा आहे.कारखाने बंद करण्यात येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.यासंदर्भात योग्य पध्दतीने नियोजन करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यांनी साखर आयुक्त पुणे यांचेकडे ४ एप्रिल २०२२ रोजी निवेदन देऊन केली होती.१५ एप्रिल २०२२ पर्यंत अतिरिक्त उसाच प्रश्न मार्गी लावण्याची मागणी ४ एप्रिल २०२२ रोजी दिलेल्या निवेदनात करण्यात आली होती.सरकार व साखर आयुक्त यांनी अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावला नसल्याने साखर आयुक्त पुणे यांना भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने प्रदेश अध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवार दि.५ मे २०२२ पासुन साखर आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर सकाळी 11 वा पासुन बेमुदत धरणे आंदोलन कार्यक्रम सुरु करण्यात आले आहे.या धरणे आंदोलनात भाजपा प्रवक्ते माधव भंडारी प्रदेश सरचिटणीस उत्तम राव माने प्रदेश उपाध्यक्ष दिलीप देशमुख,प्रदेश उपाध्यक्ष विलास बाबर, प्रदेश चिटणीस रंगनाथ सोळंके, किसान मोर्चाचे पुर्व मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे, धाराशिव जिल्हध्यक्ष संजय पाटील, यांच्यासह मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील भाजपा किसान मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत
www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898