मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे २००० ते २०१० पर्यंत कर्जमाफी व शैक्षणिक कर्ज बिनव्याजी मिळावे.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

मौलाना आझाद विचार मंच
जिल्हाध्यक्ष :- इस्माईल उस्मान पटेल वैराग ,सोलापूर. यांचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांना पत्र  मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे २००० ते २०१० पर्यंत कर्जमाफी व्हावी  तथा मुदत व शैक्षणिक कर्ज बिनव्याजी  मिळावे यासाठी
माननीय मुख्यमंत्री महोदय यांना पत्र पाठवण्यात आले,

मुस्लीम समाज हा मागासलेला असून २००० ते २०१० पर्यंत ज्यांनी ₹ २०,०००/- ते ₹ १,००,०००/- पर्यंत कर्ज घेतलेले आहे आणि ते परतफेड केलेले नाही अशा लोकांची आर्थिक स्थिती खराब झाली आहे.

कर्जदारांची वीस लाख ते पन्नास लाखाचे प्रॉपर्टीवर बोजा असल्यामुळे त्यांना दुसरे कर्ज काढता येत नाही.
अनेक कर्जदारांचे उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांना कर्ज परतफेड करणे कठीण होते.
काही कर्जदारांचे निधन झाले आहे आणि त्यांच्यावर कर्जाचे बोझा आहे.
या सर्व परिस्थितीमुळे, कर्जदारांचे जीवनमान खराब झाले आहे आणि ते अनेक सामाजिक आणि आर्थिक समस्यांना तोंड देत आहेत.
म्हणून मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाने २००० ते २०१० पर्यंत दिलेल्या कर्जांची माफी करावी.
मराठा बांधवांसाठी राबविण्यात आलेल्या बिनव्याजी कर्ज योजनेप्रमाणेच मुस्लीम बांधवांसाठीही मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाद्वारे बिनव्याजी कर्ज योजना राबवण्यात यावी. अशी विनंती करण्यात आली.


starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!