परांडा प्रतिनिधी दिनांक 5 दिव्यांग निधी न मिळाल्याने आंदोलनाचा इशारा
ग्रामपंचायतीकडून 5% निधी वाटपात टाळाटाळ – दिव्यांग संघटनांचा संताप
ग्रामसेवकांकडून दुर्लक्ष
परंडा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींनी दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेल्या 5% निधीचे अद्यापही वितरण केलेले नाही. या निधीबाबत ग्रामसेवकांकडून सातत्याने टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेकडून करण्यात आला आहे.
निवेदनांची दखल नाही
संघटनेच्या वतीने तीन ते चार वेळा निवेदने दिली गेली असूनही ग्रामपंचायत कार्यालयांनी निधी वितरणाची कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. वेळोवेळी कारणे सांगून हे काम थांबवले जात असल्याने दिव्यांग बांधवांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आमरण उपोषणाचा इशारा
या पार्श्वभूमीवर, पुढील 15 दिवसांत दिव्यांगांचा 5% निधी वाटप न झाल्यास पंचायत समिती परंडा कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिव्यांग संघटनेकडून देण्यात आला आहे.
नेतेमंडळींची उपस्थिती
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप डोके, सचिव रियाज पठाण, प्रदेश उपाध्यक्ष अमोल शेळके, जिल्हा अध्यक्ष पांडुरंग मिसाळ, जिल्हा उपाध्यक्ष घनश्याम शिंदे, परंडा तालुका अध्यक्ष पांडुरंग चौबे, सिरसांव शाखा अध्यक्ष ओम सुतार, महिला अध्यक्षा सखुबाई गायकवाड, सचिन लटके, मुरलीधर मोहरे व दत्तात्रय मुके उपस्थित होते.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898