बार्शी प्रतिनिधी दिनांक १७ १४ वर्षाखालील इयत्ता आठवी मधील चि स्वराज्य उमेश डोईफोडे, चि जयसिंह हरीश कुमार शिंदे,चि.माधव विठ्ठल शिंदे या जलतरणपटूंनी श्रीलंकेपासून भारतापर्यंत पाल्क सामुद्रधुनी ३० किलोमीटर खुल्या समुद्रात पोहण्याचा ऐतिहासिक विक्रम केला आहे.
या आधी विजयदुर्ग, मालवण, पोरबंदर आणि कोची येथे सागरी जलतरणात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तसेच शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये देखील चमकदार कामगिरी केली आहे.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल विद्यालयाच्या वतीने खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
या यशस्वी खेळाडूंना पी डी पाटील, योगेश उपळकर व विकास पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व खेळाडूंना संस्थेचा कर्मवीर जलतरण तलाव सरावसाठी नेहमी उपलब्ध होता.
या यशाबद्दल सर्व जलतरणपटूंचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी.टी.पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य ए.पी. देबडवार, संस्थेचे खजिनदार तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ मिराताई यादव , एस.बी. शेळवणे,सर्व कार्यकारिणी सदस्य ,सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक आर.बी. सपताळे, पर्यवेक्षक एस.सी. महामुनी,पर्यवेक्षिका एन.बी. साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898