स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा, दि. ३१: परंडा तालुक्यातील मौजे चव्हाणवाडी येथील शेतकरी अकाली पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे हवालदिल झाले आहेत. मुग आणि उडीद या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. चांगले उत्पन्न मिळेल या आशेने शेतकरी मेहनत घेत होते. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे त्यांचे सर्व मेहनतीचे फळ पाण्यात गेल्यासारखे झाले आहे.
या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यांच्या तोंडातला घासच गेल्यासारखे झाले आहे. या संकटातून शासन शेतकऱ्यांना बाहेर काढेल, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.
परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तरी धाराशिव जिल्ह्याचे पालक मंत्री आणि भूम-परंडा-वाशी तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी तात्काळ प्रशासनाला सांगून पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत शासन दरबारी तात्काळ कार्यवाही करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
