www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
आज तुमच्या पुढच्या पिढीचे भविष्य उज्ज्वल व्हावे या करीता जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार बार्शी तालुक्यात “श्री आनंद काशीद” अमरण उपोषणास बसले आहेत, या पूर्वी त्यांनी 5 दिवस अमरण उपोषण केले, तसेंच 85 दिवस साखळी उपोषण केलं. त्या दरम्यान दीपावळीची अंघोळ देखील तहसील समोर केली, ज्या ज्या कोणी आरक्षणाला विरोध केला त्या त्या सर्वांना सडेतोड उत्तरे आंदोलन स्थळा वरून श्री आनंद काशीद यांनी दिली.
मग हे सर्व ते तुमच्या साठी करताना तुम्ही काय करता हा प्रश्न मला पडतो, याचा अर्थ तुम्ही सर्वजणच काय करत नाही अश्यातला भाग नाही बरेच जण काय तरी करतात पण अनेक जण मात्र फक्त बघ्याची भूमिका घेतात किंवा फक्त लांबून किंवा जवळून वा छान वा छान, बघा कशे मराठे लढातंय एवढं बोलतात. असो मला फक्त एवढच सांगायचंय कि या समाजाच्या लढाईत आपली पुढची पिढी ज्या वेळी तुम्हाला विचारेल जरांगे पाटलांच्या आंदोलनावेळी तुम्ही कोणत्या प्रकारे त्यात सहभागी झाला होता, त्या वेळी त्यांना काय सांगणार मी कामात होतो, मला सुट्टी नव्हती, का मी नेता पुढारी किंवा आणखी कोणी तरी काय तरी म्हणेल म्हणून मी तिकडं गेलो नाही मग त्या वेळी त्या मुलांच्या नजरेत नजर मिळवू शकाल का हे फक्त लक्ष्यात घ्या.
तर माझ आस म्हणणे आहे कि आजून वेळ गेली नाही आत्ता तरी आपण आपला वेळ तरी किमान समाजासाठी द्या बार्शी तहसील समोर आपल्या भविष्यासाठी जे आनंद काशीद अमरण उपोषणास बसले आहेत त्यांना भेट देऊन त्यांचे मनोबल तरी वाढवा हिच माझी अपेक्षा आपण मराठा म्हणून समाजासाठी एवढं तरी करा.
जय जिजाऊ….!!
जय शिवराय…..!!

