पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- दि ८ नोव्हेंबर २०२३ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष डॉक्टर कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी आज दिनांक ८ जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चा आकुर्डी चौक ते तहसील कार्यालय निगडी या मार्गावर काढण्यात आला. जातीनिहाय जनगणना करून सर्व मागासवर्गीयांना आरक्षण देण्यात यावे, शेतकरी पिक विम्याचे पैसे तात्काळ देण्यात यावे, बेरोजगार युवकांसाठी त्वरित नोकरी भरती करण्यात यावी, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस चे दर त्वरित कमी करण्यात यावे राज्यात सध्या गाजत असलेल्या अमली पदार्थांच्या घटनांवर नियंत्रण करून संबंधितांना कठोर शासन करण्यात यावे. या प्रमुख मागण्यासाठी आज हवालदिल झालेल्या जनतेच्या भावनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि त्यांच्या आक्रोश व्यक्त करणाऱ्या जन आक्रोश मोर्चाचे आयोजन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. या मोर्चादरम्यान तहसील कार्यालयासमोर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे प्रवक्ते गौरव चौधरी, ज्येष्ठ महिला नेत्या शामलताई सोनवणे, डॉक्टर कैलास कदम यांनी मनोगते व्यक्त केली याप्रसंगी बोलताना डॉक्टर कैलास कदम म्हणाले केंद्र सरकारच्या धोरणामुळे एकंदरीतच कामगार, कष्टकरी, शेतकरी, सर्वसामान्य, नोकरदार, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक, गृहणी, सर्व हवालदिल झाले आहेत, प्रचंड महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार वाढवून सोबत येडी आय टी, सी बी आय या यंत्रणाचा गैरवापर करत राजकीय सुडाचे राजकारण या भाजपाने देशभरामध्ये सुरू केलेले आहे. राज्यातील परिस्थिती पाहता देखील या तिघाडी सरकारच्या माध्यमातून केवळ आश्वासनाचा पाऊस आणि ठोस कृती कार्यक्रम नाही नसल्याचे चित्र दिसून येत आहे. याप्रसंगी माझी महिला प्रदेशाध्यक्ष श्यामला सोनवणे, शिक्षण मंडळ माजी सभापती अभिमन्यू दही तुले, सेवादल अध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्लेकर, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, युवक प्रवक्ता गौरव चौधरी, डॉक्टर सेल अध्यक्ष मनीषा गरुड, ग्राहक सेल अध्यक्ष जेव्हीआर अँथोनी, पथारी सेल अध्यक्ष गौरी शेलार, व्यापारी सेल अध्यक्ष अमरजीत पातवाल, आदीसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898