स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- देहू येथील इंद्रायणी नदीमध्ये होत असलेले विविध जलप्रदूषणामुळे काल दि.१६ अनेक मासे मृतावस्थेत आढळले. इंद्रायणी जलप्रदूषण मुक्तीसाठी आळंदी मध्ये साखळी उपोषण करण्यात आले होते. याबाबत इंद्रायणी फाउंडेशनचे विठ्ठल शिंदे यावेळी म्हणाले हे उपोषण कशासाठी ठेवण्यात आले होते,? तर इंद्रायणी नदीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने दहा दिवसात त्या संदर्भात बैठक बोलवण्याचे लेखी पत्र दिले होते. अजूनही बैठक बोलवण्यात आलेली नाही. इंद्रायणीचे प्रदूषण त्यांनी अजूनही रोखले नाही उलट देऊ या गावांमध्ये मासे मृत पडलेले आहेत. याचे दोषी कोण? जल प्रदूषणामुळे जलचर सृष्टी धोक्यात येत असेल तर ते जलप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद कायद्याने करावी. त्यांची अंमलबजावणी कधी करणार असे जल प्रदूषण होऊ नये यासाठी प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी देवगाव ग्रामस्थ यांनी केली आहे.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898




Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.