पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- देशाच्या जडणघडणीमध्ये महामानवांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे असुन त्यांच्याकडे केवळ जातीधर्माच्या सीमित दृष्टीकोनातून न पाहता त्यांनी देशाच्या प्रत्येक समाजासाठी जे कार्य केले आहे ते समजून घेणे गरजेचे आहे. समाज परिवर्तनासाठी आणि प्रगतीसाठी आपल्या मनात महापुरुषांच्या विचारांचा वारसाचा वैचारिक पाया अधिक मजबूत करून त्यांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांनी केले क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तरपालिकेच्या वतीने ते पंधरा एप्रिल पाच दिवसीय विचार प्रबोधन परवाचे आयोजन करण्यात आले. आहे या प्रबोधन परवाचे उद्घाटन पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास विशेष निमंत्रित म्हणून डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर उपस्थित होते. यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना डॉक्टर आंबेडकर होते. यावेळी अतिरिक्त आहे जगताप आरोग्य वैद्यकीय अधिकारी तथा विचार प्रबोधन परवाचे मुख्य आयोजक डॉक्टर पवन साळवे ,उप आयुक्त रवी किरण बोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कनिष्ठ अभियंता तथा संयोजक विजय कांबळे चंद्रकांत पाटील, राजदीप ताई तायडे, माजी नगराध्यक्ष सुलक्षणा धर, चंद्रकांता सोनकांबळे, माजी नगरसेवक मारुती पकर, एडवोकेट गोरक्ष लोखंडे, सतीश दरेकर, माजी कार्यकारी अभियंता शरद जाधव, सामाजिक कार्यकर्ते अण्णा कुदळे, प्रल्हाद कांबळे, बापूसाहेब गायकवाड, धर्मराज साळवे, विनोद गायकवाड यांच्यासह विविध संघटनेचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.