स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी मोशी :- राष्ट्राच्या उभारणीत व साहित्य संस्कृती टिकवण्याचे शिक्षकांचे योगदान अमूल्य आहे साहित्य हे आनंद,करमणुकीबरोबरच सामाजिक विचार मांडून गरिबांच्या व्यथा मांडणारे असावे .शिक्षक ज्यावेळी निवृत्त होतात तोपर्यंत ते सेवेतच वाहून घेतात, पण निवृत्तीनंतर काही राष्ट्र उभारण्यासाठी प्रयत्नशील राहतात.या देशातील रूढी परंपरा, संस्कृती जोपासण्यासाठी ते काम करतात.आता केंद्र सरकारने शिक्षणाबाबत एक ऑनलाईन मसुदा जाहीर केला असून त्याचे निवृत्त शिक्षकांसह सर्व शिक्षकांनी निरीक्षण करावे.यामध्ये गरिबांच्या शिक्षणाविषयी चिंतन ,मनन म्हणून झाले पाहिजे.त्यामुळे आमच्यासारख्या विधिमंडळ सदस्यांना सभागृहात भूमिका मांडण्यासाठी उपयोग होईल असे प्रतिपादन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.इंद्रायणी साहित्य संमेलना “राष्ट्र उभारणीत शिक्षकांचे योगदान” या परिसंवादाच्या वेळी वळसे पाटील बोलत होते.मोशी येथील यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी, रवींद्रनाथ टागोर विचारपीठाडावर यावेळी माजी आमदार विलास लांडे, संमेलनाचे अध्यक्ष कामगार नेते व माजी नगरसेवक अरुण बोर्हाडे, परिसंवादाचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, स्वागत अध्यक्ष संतोष बारणे,प्रा. एकनाथ फुरसे, परिसंवादात सहभागी झालेले शिक्षक तसेच विक्ष्वकर्मा पब्लिकेशनचे विशाल सोनी ,कार्यकारीनी मंडळाचे अध्यक्ष संदीप तापकीर, इंद्रायणी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.सीमा काळभोर, विकास कंद, सचिव रामभाऊ सासवडे , सहसचिव डॉ.ए.ए.मुलानी, कोषाध्यक्ष अलंकार हिंगे,सदस्य दादाभाऊ गावडे, श्रीहरी तापकीर, सुनील जाधव आदी उपस्थित होते.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.