स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या पूर्वीचे मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाचा नामविस्तार दिनांक 14 जानेवारी1994 रोजी करण्यात आला . या नाम विस्तारासाठी हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित असलेल्या आणि निजामाच्या राजवटीत जे मागासलेपणाच्या यातना भोगत होते त्यांना शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1950 साली मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली . या महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर श्री गोविंद भाई सराफ आणि माणिकचंद पहाडिया यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेबांच्या भेटीला आले होते . बाबासाहेबांशी बोलताना त्या शिष्टमंडळाने आपण हे जे महाविद्यालय सुरू करत आहात त्या ठिकाणी चालेल का असा प्रश्न केला होता .

बाबासाहेबांनी त्यांना सांगितले होते की औरंगाबादला फक्त एकच महाविद्यालय उभारून चालणार नाही तर एका विद्यापीठात सुद्धा गरज आहे आणि ते विद्यापीठ उभे राहावे अशी माझी तीव्र इच्छा आहे या बाबासाहेबांच्या प्रयत्नांचे फलित म्हणून 1998 साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली . या विद्यापीठाला नाव काय द्यावे हा प्रश्न समोर आला होता तेव्हा महाराष्ट्र सरकारने नाव निश्चित करण्यासाठी एक समिती गठित केली . शासन नियुक्त समितीने विचारार्थ घेतलेल्या व गांभीर्याने चर्चा केलेल्या नावांमध्ये मराठवाडा औरंगाबाद पैठण प्रतिष्ठान दौलताबाद देवगिरी अजिंठा शालीवाहन सातवाहन असे सर्व स्थळ व भूमी राज्यवाचक नावे होती . त्या ठिकाणी फक्त दोनच नावे व्यक्तीची केली जात होती त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर . यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने अगोदरच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर 1960 साली स्थापन झाले होते . शिवाजी महाराजांचे उचित विद्यापीठ स्मारक झाले परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यापीठीय स्मारक झाले नाही म्हणून या विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचे राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एक मताने ठराव 1978 साली संमत करण्यात आला . या गोष्टीचा महाराष्ट्रातील आंबेडकर व जनतेला खूप मोठा आनंद झाला . परंतु काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले गेले . त्यांनी या विद्यापीठाच्या नामांतराला विरोध केला . परंतु त्यांच्या विरोधाला तमाम आंबेडकर जनता मुळीच डगमगली नाही . नामांतराचा हा लढा पुढे चालूच ठेवला गेला . बाबासाहेबांचे नाव या विद्यापीठाला मिळावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या बलिदानाची पर्वा केली नाही . बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला देण्यात यावे म्हणून वाटेल ते करण्यास आंबेडकरी जनता तयार होती . कारण नामांतराची लढाई ही आता दिन दलीतांच्या अस्मितेची लढाई होती . ही चळवळ म्हणजे महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वात मोठी लढाई होती . या लढ्यात कित्येक क्रांतिकारक शहीद झाले होते .

किती तरी युवक युवतींना आपले प्राण गमवावे लागले होते . कित्येकांच्या घरादाराची राख रांगोळी झाली होती . कित्येक दलित आया भगिनींवर बलात्कार झाले होते . तर काही गावात दलित रस्त्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता . सार्वजनिक पानवटयावर त्यांना बंदी घालण्यात आली होती . अनेक गावातून दिल दलित आया भगिनींच्या भर चौकातून उघड्या नागड्या दिंडी काढण्यात आल्या होत्या . नामांतरच्या काळामध्ये जातीयवादी नराधमांनी अत्याचाराची सीमा ओलांडून टाकली होती . पोलिसांनी सुद्धा लहान बालके स्त्री वृद्ध पुरुष और बेसुमार लाठी चार्ज केले होते . तर काही वेळा बंदुकीचाही वापर केला गेला . विद्यापीठ म्हणजे काय हे सुद्धा त्यांना माहीत नव्हते या दिन दुबळ्या दलितावर खेडोपाडी अमानुसपणे अत्याचार करण्यात आले होते . आईचे लेकरू आईविना पोरके झाल्यासारखे दलित बांधवांची अवस्था झाली होती . आणि एवढे होत असताना भीम सैनिकांनी कधीच माघार घेतली नाही . केवळ बाबासाहेबांच्या नावासाठी दलित बांधवांनी अनेक जुलूम सहन केले . गावोगावी शहरात खेड्या पाड्यापर्यंत नामांतराच्या आंदोलनाची ठिणगी पडली होती . जिकडे तिकडे एकच नारा गुंजत होता नामांतर झालेच पाहिजे . गौतम वाघमारे या कार्यकर्त्याने नांदेडमध्ये नामांतर करत नाहीत म्हणून स्वतःला चौकात जाळून घेतले तो अखेरच्या श्वासापर्यंत लढत होता . त्याचा एकच नारा होता नामांतर झालेच पाहिजे डॉ बाबासाहेबांच्या नावासाठी त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले . पोचीराम कांबळे या दलित बांधवांचे परभणी जिल्ह्यात हात पाय तोडण्यात आले . जातीवादी सैतानांनी जर्जर करून त्याला ठार मारले . जनार्दन मवाडे संगीता बनसोडे सुहासिनी बसोड प्रतिभा तायडे अविनाश डोंगरे चंदन कांबळे दिलीप रामटेके रोशन बोरकर अशी किती तरी दलित क्रांतिवीर नामांतराच्या लढयात शहीद झाले. जातीवादी सरकार नामांतर करत नाही म्हणून दलित मुक्ती सेनेचे सरसेनापती आणि लॉंग मार्च प्रणेते प्रा जोगेंद्र कवाडे यांनी दलित बहुजन समाजाची फौज जमा करून नागपूर ते औरंगाबाद असा लाँग मार्च आयोजित करून जिंकू किंवा मरू जळतील नाहीतर जाळून टाकतील अशी आक्रमक भूमिका घेतली होती . या लॉंग मार्च मधील निष्पाप लोकांवर इंग्रजांनाही लाजवेल अशी क्रूरपणे लाठी हल्ले केले . अश्रु धुरांच्या द्राच्या नळकांड्या फोडण्यात आल्या . कित्येकांना तुरुंगात डांबले या निष्पाप देवतांचा गुन्हा काय तर आपल्या बापाचे बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला द्यावे ही मागणी होती . ज्यांनी दिन दलीत पिचलेल्या आणि उच्च भ्रु समाजाने वाळीत टाकलेल्या समाजातील माणसाला माणूस पण मिळून दिले जगण्याचा हक्क दिला केवळ त्या उत्तरदायित्वा पोटी बाबासाहेबांच्या नाव विद्यापीठाला द्यावे ही रास्त व न्याय पूर्ण मागणी गुन्हा ठरवून अमानुष वागणूक देणाऱ्यांचा निषेध या ठिकाणी केला पाहिजे . तत्कालीन मुख्यमंत्र्याला समजले की बाबासाहेबांची ही लेकरं बाबासाहेबां साठी प्राण द्यायला मागेपुढे पाहत नाहीत जर यांच्या संयमाचा अंत झाला तर हीच लेकर दुसऱ्याचा प्राण घ्यायला सुद्धा मागे पुढे पडणार नाहीत त्यांवेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज होता नामांतर नामांतर . त्यांच्यासमोर नामांतरा शिवाय पर्याय नव्हता म्हणून सतरा वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला मागार घ्यावी लागली आणि 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असा नामविस्तार करण्यात आला .
ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली ज्या राज्य घटनेवर संपूर्ण देश चालतो मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे सर्वप्रथम कल्पना मांडली अशा महापुरुषाचे नाव विद्यापीठ देण्यासाठी सतरा वर्ष संघर्ष करावा लागला . नामांतर झाले पण ते पण अर्धवट ही खंत आजही बाबासाहेब आंबेडकर यांच्या सैनिकांच्या मनामध्ये आहे . विद्यापीठाचे पहिले नाव मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि नामांतर नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद एवढे झाले नामांतराची लढाई ही प्रतिकात्मक सामाजिक समतेची लढाई होती . म्हणून 14 जानेवारी 1994 पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार हे आंबेडकर समाजाचे प्रेरणास्थान बनले .प्रत्येक वर्षी 14 जानेवारी रोजी समस्त आंबेडकरी जनता डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराची मनापासून पूजा करतात . जसे काही साक्षात आपण बाबासाहेबांपुढे नतमस्तक होत आहोत या भावनेने विद्यापीठाच्या गेटपुढे सर्व भीमसैनिक नतमस्तक होतात . केवळ नाममात्र शुल्कामध्ये उच्च शिक्षण देणारे देशामधील हे पहिले विद्यापीठ आहे . मराठवाडा विदर्भ खानदेश भागातील शेतकरी शेतमजूर दलित कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूमी म्हणून विद्यापीठाने नावलौकिक मिळविला व लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देऊन त्यांच्या आयुष्याला आकार दिला .शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे दूध जे प्राशन करतील ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाहीत हे बाबासाहेबांचे विचार आज बहुजन समाजातील अनेक अठरापगड जातीच्या विद्यार्थ्यांना उपयोगी ठरले आहेत .बाबासाहेबांनी उभा केलेल्या या शैक्षणिक संकुलामुळे आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील खेड्यापाड्यातील गोरगरीब होतकर विद्यार्थी पदवी व पदव्युत्तर उच्चशिक्षण घेऊन स्वतःचे या मराठवाड्याचे आणि महाराष्ट्राचे नाव नावलौकिक करत आहे .
आज याच विद्यापीठातून शिक्षण घेऊन मराठवाड्यातील अनेक तरुण-तरुणी देशाच्या विविध भागांमध्ये मुख्य पदावर आपली जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत याचे श्रेय केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जात .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाची भूमिका मांडली नसती तर हा मराठवाडा शिक्षणापासून कायमचा वंचित राहिला असता शिक्षणापासून कोसो दूर राहिला असता .कारण शिक्षणाचा देशाला तारू शकते हे बाबासाहेबांनी ओळखले होते म्हणून या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठवाडा हा सर्वात मागासलेला भाग असल्याने या मराठवाड्याला मराठवाड्यातील तरुणांना शिक्षणाची नितांत गरज बाबासाहेबांनी ओळखून या मराठवाड्यामध्ये औरंगाबाद सारख्या ठिकाणी मिलिंद महाविद्यालय स्थापन तर केलेच परंतु आज मराठवाडा विद्यापीठ अर्थातच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर हे देशात सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून नावलौकिक आहे याचा सार्थ अभिमान आम्हास वाटतो .
प्रा डॉ शहाजी चंदनशिवे
सहयोगी प्राध्यापक व संशोधन मार्गदर्शक
प्राणीशास्त्र विभाग
शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा
जिल्हा धाराशिव महाराष्ट्र राज्य .
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.