स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज पासून घरगुती वीजदरात ६ टक्क्यांनी वाढ केल्याचा आरोप करत ही दरवाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात भापकर यांनी म्हटले आहे की, टोल व एलपीजी सिलिंडर महाग होणार आहेत.करोना म्हामारीच्या झालेल्या तीन लॉकडाऊनमुळे उद्योजक, लघुउद्योजक, लहान मोठे व्यापारी, सामान्य नागरिक, यांच्यावर विपरित परिणाम झाले आहेत.त्यातून सामान्य माणसाच्या हातून रोजगार गेला आहे.प्रचंड बेरोजगारी वाढली आहे.तसेच यापूर्वी वारंवार पेट्रोल डिझेल गॅसचे प्रचंड दर वाढले आहेत.यामुळे महिलांचे किचन बजेट ढासळले आहे.या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी, कामगार, उद्योजक, लघुउद्योजक, छोटे मोठे व्यापारी व नागरिक बेरोजगारी आणि महागाईमुळे मेटाकुटीला आलेला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज पासून घरगुती वीजदरात ६ टक्क्यांनी वाढ केल्याचा आरोप करत ही दरवाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे. अशा परिस्थितीत वीजदरात ६ टक्के दरवाढ ही सामान्य माणसाची कंबरडे मोडणारी ठरणार आहे.त्यामुळे या ईडी सरकारचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करीत आहोत.ही सर्व दरवाढ ईडी सरकारने तात्काळ मागे घ्यावी.अन्यथा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत सामान्य जनता, कामगार, शेतकरी, उद्योजक व्यापारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना घरचा रस्ता दाखवला शिवाय स्वस्त बसणार नाही.सरकारणे याची गंभीरपणे नोंद घ्यावी अशी मागणी केली.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.