www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898
बार्शी ( प्रतिनिधी ) बार्शी शहरातील नावाजलेल्या शाळेकडून परीक्षा फी म्हणून 160 रूपयाची मागणी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून होत आहे.
संबंधित शाळेकडून पालकांनी पावतीची मागणी केली असता शाळा प्रशासनाकडून पावती देण्यास मनाई करण्यात आली आहे.
उपमुख्याध्यापकांना फोन केला असता आमची शाळा पावती देतच नाही असे पालकाला सांगण्यात आले.
मुख्याध्यापक यांची प्रतिक्रीया तर फारच मजेशीर आहे ते म्हणतात घटक चाचणी ची प्रश्नपत्रीका महागली आहे म्हणुन परीक्षा फी आहे.
प्रत्येक विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी आकारणी करण्यात येत असेल तर शाळेकडे किती रूपये गोळा होतात याचा उपयोग कोठे होतो ?
याचा हिशोब असतो का ?
पावती न देण्याचे कारण काय ?
अशी चर्चा पालकांमधुन होत आहे.
संबंधित प्रशासनाकडून याची चौकशी होणार का ?

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.